जेव्हा शेतकरी जीव देतो
बेटा, काकांनी तुझ्या विष
पिलं
धनगर काकूंनी रडत रडत
सांगितलं.
शेतकरयाचा जन्म घेतला म्हणे पापं आपण
केलं
फरक नही कुणाला, माणूस मेला कि कुत्रं
मेलं
सांगून गेलेत कि मला आपल्याच जमिनीत
पूरा
निदान शरीराचे खत होऊन जनावरांना तरी
मिळेल चारा
सरकारी डॉक्टरच तर चांगलच भलं झा ले
म्हणे आत्महत्येचा रिपोर्ट देईल, जर
दहा हजार दिले
कंटाळून, विहिरीत जीव दिला काकुंनी
चिमेला सोबत घेऊन
महिना झाला होता
तेव्हा काकांना देवाघरी जाऊन
भयाण झालंय अंगण, भयाण झालाय वाडा
अनाथ झाली जनावरं, मोडून पडला
संसाराचा गाडा
नंतर,
गेली सोडून काकांची सर्वात जुनी गाय
म्हटली असेल,जगून मी तरी
करू काय
कुठे गेली माणुसकी? अशीच आहे का
माणसाची जात?
का हतबल झालोय मी? कधी होईल यावर मात?
शोधत होतो उत्तर तोच पुन्हा निरोप
आला,
आणि यावेळी, दिनकर काकांनी जीव दिला
...
>>
पंकज नारायण